अहमदनगर : येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली आहे.गतवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही स्पर्धेत सहभागी मंडळांना पुरस्कार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेअंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे व ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ गणेश मंडळांची निवड करण्यात येणार आहे.